Wednesday, July 29, 2020

mati2

जमिनीची धुप:



भुपृष्ठ भागावरील  माती एका ठिकाणावरुन दुसर्‍या ठिकाणी वाहुन जाण्याची क्रिया होते तेंव्हा जमीनिची धूप झाली असे म्हणतात. ही धूप होण्याची अनेक नैसर्गीक तसेच  मानवी कारणे आहेत. नैसर्गीक कारणे म्हणजेअति्व्रुष्टी, पाण्याचे प्रवाह , वादळ, वारा, हिमनद्या ह्यामुळे प्रुथ्वीच्या भुपृष्ठ भागावरील माती वाहुन जाते.



https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%A3



उदाहरणार्थ:  ओठ्याकाठची जमीन, डोंगरावरची जमीन,  डोंगर पायथ्याची जमीन.





मानवी कारणे:

माणसांकडुनही प्रुथ्वीचे खनन होते व वेगवेगळ्या कारणांसाठी एका ठिकाणची माती दुसर्‍या ठिकाणी वाहुन नेली जाते.तसेच शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अतीरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते.





शिक्षकाने जमिनीची धूप आपल्या गावात कुठे होते याची उधाहरणे मुलांना सांगावित.



माती संवर्धणाची तंत्रे:



माती संवर्धणासाठी आपण काय काय करु शकतो?



नैसर्गीक कारणांनी जी जमिनीची धूप होते ते थांबवण्यासाठिचे उपाय:

१. जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.

२. जंगल तोड होवु देवु नये, किंवा झाली असेल तर विचार्पुर्वक धुप थांबवण्यासाठी लावली जाणारी देशी झाडे लावावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरणाचा नियम आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

३.  ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने ताली घालणे,

४. पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.





शेतासाठी मानवी कारणांनी जी जमिनीची धूप होते ते थांबवण्यासाठिचे उपाय::



5.अतीरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी विशीष्ट गवताची लागवड फायदेशीर ठरते. या गवताचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर गवती आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

6.पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाणे 90% पाण्याची बचत होते, त्याला उत्तेजन द्यावे.

7. पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.

8. शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.

9. उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.

10. धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.







मातीचे प्रदूषण:
आज मातीचे खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.



प्रदुषणाची कारणे व ऊपाय

कारणे:

१. रासायनिक खते व कीटनाशके यांचा अतिरेकी यांचा वापर-

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदा नापीक होते. मातीतील पिकांना आवश्यक उपयुक्त जीवजंतु मरून जातात. शेतीतील पिकांना पाणी देताना पिकांसाठी वापरलेली विषारी रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्यात मिसळून उतरणे वाहून जातात. व नद्या ओढे, तलाव यांना जाऊन मिळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. भारतात ऊसाच्या पिकाला अति पाणी व अतिरसायनिक खते वापरल्याने जमिनी नापीक व चोपड बनत चालल्या आहे. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फरडाय ओक्साईड हे वायु तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.

२. शेतीतील आधुनिक मशागत पद्धती

३.औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम :
उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, अविघट्नशील कचरा व वापरात न आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटकांच्या मिश्रणातून मातीचे नापीक होणे.

४. सांडपाण्याचा योग्य निचरा न केल्यामुळे , मृदेच्या प्रदूषनामुळे रोगांच्या साथी पसरतात

५. उद्योगधंद्यातील हानिकारक किरणोस्तारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पति, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ. समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो.

५.वनस्पती/ जंगलतोडीचे परिणाम : जगात सर्वत्र कारखाने, वस्त्या, विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमीनिवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. व शेती क्षेत्र व जंगलक्षेत्र घटले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. जंगले घटल्याने भुपृष्टावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असहय उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डाय ओक्साइड यांचा समतोल ढासळतो.

उपाय:

१,जलसंचयन व वनस्पति व जंगल क्षेत्रात वाढ करणे

२, कचर्याचे वर्गीकरण योग्य तर्‍हेने करणे, प्लास्टीक संसाधनांचा कमीत कमी वापर व पुन्र्वापर करणे. व अविघटनशील कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावणे.

३.जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना आखणे

४. शेतीची योग्य मशागत पद्धती व शेती सिंचन : पिकांना त्यांच्या गरजे पुरतेच पाणी द्यावे पिकांच्या पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेतीला अतिरिक्त पाणी देऊन ते वाया घालऊ नये, पिकांचे नुकसान करू नये. शेतीतील पिके आलटून पालटून घेताना कस, मातीची सुपीकता वाढेल अशी पिके घ्यावीत. शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी. शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये. मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.


https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3

https://vishwakosh.marathi.gov.in/27303/





भूस्खलन म्हणजे काय ?

https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92d94293894d91693292893e91a947-90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928



माळीण गावातील दरड दुर्घटना

https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92e93e933940923-91793e93593e924940932-926930921-92694193094d91891f92893e-91593e93092392e93f92e93e90293893e#section-2



संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/

No comments:

Post a Comment